23 C
Nashik
Saturday, July 5, 2025
spot_img

सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या उज्वल भवितव्यासाठी बदलाची आवश्यकता!; महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे

410 Post Views

सिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर विधानसभा मतदार संघाची सत्ता मागील वीस वर्षापासून केवळ एका व्यक्तीच्या हातात आहे.त्यामुळे संबंधित व्यक्तीची मनमानी मतदारसंघात सुरू आहे. मी केवळ मोठे कामे करतो,छोट्या कामांसाठी माझ्याकडे वेळ नाही, अशी त्यांची भूमिका आहे.त्यामुळे छोट्या छोट्या कामांपासून मतदार वंचित राहतो आहे. मतदारसंघाचे भवितव्य घडवायचे असेल तर त्यासाठी या वेळेला बदल करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन सिन्नर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांनी केले.

सिन्नर विधानसभा मतदारसंघातील टाकेद गटातील सोळा गावांमध्ये उदय सांगळे यांनी शुक्रवारी बिरसा मुंडा जयंती निमित्ताने प्रचार केला. त्यावेळी मतदारांशी संवाद साधताना उदय सांगळे बोलत होते. बिरसा मुंडा जयंती निमित्ताने उदय सांगळे यांनी ठिकठिकाणी अभिवादन केले. यादरम्यान सांगळे यांची बैलगाडीवरून मिरवणूक काढण्यात आली. उदय सांगळे पुढे म्हणाले की, क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारणार, असे आश्वासन विद्यमान आमदारांनी दिले होते. परंतु पाच वर्षे झाली,त्याची पूर्तता झाली नाही. केवळ आश्वासन द्यायचे, आणि काम करायचे नाही,अशी त्यांची नीती त्यांची आहे. आदिवासी समाजाची मते घ्यायची, मात्र आदिवासी समाजाची कामे करायची नाही,आदिवासी आमदारांना मंत्रालयात उड्या माराव्या लागतात. तरी त्यांच्या समस्या मार्गी लागत नाही, घड्याळाला मतदान म्हणजे भारतीय जनता पार्टीला मतदान आहे. भारतीय जनता पार्टीचे धोरण आदिवासी समाजाच्या विरोधात असल्याचे मणिपूर येथील घटनेवरून स्पष्ट दिसून येते. असे उदय सांगळे यांनी सांगितले. याप्रसंगी भारत कोकाटे, निवृत्ती जाधव (उपजिल्हा प्रमुख उबाठा), काशिनाथ कोरडे, किरण डगले, हरिदास लोहकरे, साहेबराव झंकार, खंडेराव ओझंकार, समाधान वारंघुसे, भाऊसाहेब वाजे, सह आदिवासी बांधव, कार्यकर्ते पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज  संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

सख्या भावाचे नाही झाले…

महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांनी विद्यमान आमदार कोकाटे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, माझ्यासोबत भरत कोकाटे आहेत. ते आमदारांचे सख्खे भाऊ आहेत. आमदार आपल्या सख्ख्या भावाचे झाले नाही.तर ते सामान्य जनतेचे काय होणार, असा मुद्दा यावेळी सांगळे यांनी उपस्थित केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles