452 Post Views
देवळाली कॅम्प, प्रतिनिधी
भारत देश शुरवीरांची भूमी आहे. भारतावर अनेक आक्रमणे झाली. भारतीय सैन्याने शत्रूंना परतावून लावले. प्रसंगी रक्त सांडले. त्यांच्या बलिदानाची आठवण आपण ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती डी.बी. मोगल यांनी केले.
देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमालबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात गुरुवारी ( दि.२५ ) भारत सरकारच्या प्रसारण आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने भारत की आजादी का अमृत महोत्सव व कारगिल विजय दिन या कार्यक्रमाचे उदघाटन मविप्र संस्थेचे उपसभापती डी.बी. यांनी मोगल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपसभापती डी. बी. मोगल बोलत होते.
जत्रा हॉटेल शिवारातील स्वप्नाच्या घरासाठी एकमवे विश्वासपात्र “समृद्धी बिल्डकॉम”
