177 Post Views
नाशिकरोड : प्रतिनिधी
“विद्युत सुरक्षा ही काळाची गरज असून, विद्यार्थी हेच पुढील काळातील विद्युत सुरक्षा दूत ठरणार आहेत” असे प्रतिपादन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सुरक्षा) डॉ. जितेंद्रकुमार राठौर यांनी केले.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे देण्यासाठी महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा विभाग, एकलहरेच्या पुढाकाराने विद्युत सुरक्षा मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून, याअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर येथे नुकतेच आयोजित कार्यशाळेत डॉ. राठौर यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विद्युत सुरक्षा विषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
