1,119 Post Views
इगतपुरी तालुका:विक्रम पासलकर
गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या कधी हलक्या तर कधी मध्यम स्वरूपाच्या पावसाने अलीकडच्या पंधरा दिवसांपासून रौद्र रूप धारण केले असून संपूर्ण तालुक्यात जलमय स्थिती बघायला मिळत आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर खुप वाढल्याने दारणा,भाम तसेच उंडओहोळ नदी दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्वच धरणातून हजारों क्यूसेक पाण्याचा मोठा विसर्ग सुरु करण्यात आलाआहे. भगुर,वंजारवाड़ी,शेवगेदारणा,संसरी,नाणेगाव गाव नदी काठ च्या गावाना प्रशासनाने सतर्क तेचा इशारा दिला आहे.
