973 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
सद्या राज्यभर उष्णतेची तीव्र लाट निर्माण झालेली दिसत आहे. धरणातील पाणीसाठा बाष्पीभनामुळे घटत चालला आहे.नाशिक शहर देखील त्याला अपवाद नाही.परिणामी पाणी कपात आणि पाणी टंचाईचा सामना शहरातील काही भागातील सामान्य जनतेला करावा लागतो आहे.नाशिकरोड व जेलरोड परिसरातील प्रभाग १७ मधील काही भागात सद्या कमी दाबाने पाणी पुरवठा,पाणी टंचाईची समस्या स्थानिक नागरिकांना भेडसावताना दिसते. या समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी सामाजिक कर्तव्य म्हणून मोफत पिण्याच्या पाण्याचा टँकर पुरविण्याचा उपक्रम सौ.प्रमिला कैलास मैंद यांनी राबविला आहे.यामुळे त्रस्त नागरिकांना उष्णतेच्या दाहकतेत माणुसकीचा झरा!, असा अनुभव येताना दिसतोय.
