1,141 Post Views
दिंडोरी : उमेश देशमुख
येथील मानोरी गावात श्री चैतन्य टेक्नॉलॉजी स्कूल या संस्थे तर्फे शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शाळेची स्थापना केलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातूनविद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याची चर्चा केली जाते आहे. भविष्यात ही शाळा बंद झाल्यास विद्यार्थी व पालकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या शाळेची तत्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी असलेले निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना दिले.
