383 Post Views
विक्रम पासलकर : इगतपुरी तालुका
मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वैतारणा या दगडी धरणासाठी संपादित केलेल्या मात्र वापरा अभावी पडुन असलेल्या अतिरिक्त जमिनीचां लिलाव होणार असल्याची चर्चा सध्या सुरु असुन यामुळे आवळीसह परिसरातील बाधित तब्बल वीस ते बावीस गावामधील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित सर्वच प्रकल्पबाधित हवालदिल झालेले असून या जमीनी परत कराव्या अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारावा लागेल असा इशारा प्रकल्प बाधित गावचे शेतकरी पंढरीनाथ जमधडे यांच्यासह शेकडो बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.
